Samiksha Jaiswal (Editor)

Samangad

Updated on
Edit
Like
Comment
Share on FacebookTweet on TwitterShare on LinkedInShare on Reddit
Similar
  
Pargadh, Santoshgad, Pavangad, Ghosale gad, Surgad

Samangad fort at gadhinglaj kolhapur maharashtra andhar kothadi


Samangad is a hill fort in Kolhapur District, Maharashtra. It is 2,600 feet (790 m) above sea level. The fort is situated on the oval-shaped top of the hill. The eight-foot-high wall of the fort which encircled the hill top is still intact. Earlier several cisterns cut out of the rock ensured a plentiful supply of water to the fort but by 1957 most of them were in ruins.

Contents

The Samangad grant, which belongs to the seventh Rasrakuta king Dantidurga or Dantivarma II, bears the date sak 675 (A.D. 733–54).

In 1676, the fortifications were considerably improved by Shivaji, subsequent to which it was known as one of the "smallest yet strongest forts" of the Marathas. In 1844, the Samangad garrison rebelled and took over the fort, shutting the gates. But it was stormed by the British Raj under a General Delamotte and retaken from the rebelling soldiers. The British Raj dismantled the fort and it has been in ruins ever since.

This fort is a tomb of famous warrior Shri Prataprao Gujar who fought against the Adil Shahi army of Bahalul Khan with only six soldiers. Stories are told by local from generation to generation.

The fort is surrounded by trees; it is developed by the government of Maharashtra as a tourist place. Also Maruti temple and Chaloba temple near fort is visited by devotees. A village near fort is Naukud, Hasursasgiri and Chinchewadi which is a rural area. Gun fire weapons at Naukud found and kept near Vithoba temple.

The other most important attraction over here is BHUI BHANGARA which means cracked land. It is actually temple of lord shiva under the crevices of rock and has got stairs to climb down. there are statues of many deities like DATTATRAY, SHANI and GANESHA. It has got long corridor there is belief among the natives here that there is a hidden tunnel from fort till here for escaping. Also the MARUTI temple near to this was built by SAMARTH RAMDAS SWAMI.The BHIMSHAPPA MATH is another prominent destination it is the shrine of local saint BHIMSHAPPA who attained nirvana here. A small village got its name BHIMSASGIRI from this saint which is later known to be HASURSASGIRI.

The spoken language around this fort is Marathi. People around this fort celebrate Samangad fair on the first Wednesday after Shivratri which is in February or March every year. During this time they perform lot of events including bullock cart race, horse cart race, bicycle race, entertainment during night time and much more.

   कोल्हापूर जिल्हयाच्या दक्षिणेस राखणदाराच्या रुपात किल्ले सामानगड उभा आहे विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्याच्या बेचक्यात अगदी मधोमध याचे स्थान असल्याने रसद पुरवठयाच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व फार आहे. कदाचित यावरुनच या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे.

इतिहास

कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनिस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या भागाची सबनीसी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामान गड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठयांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामान गडाने इंग्रजाविरुध्द प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.

पहाण्याची ठिकाणे :

गडहिंग्लजवरुन भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पठारावर पायउतार व्हायचे. चिंचेवाडी गावातील भल्यामोठया विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते.डाव्या बाजूच्या सडकेने आपण गडावर प्रवेश करायचा. या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे. त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरुज बांधलेले आहेत.

गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने आपण गडाच्या तटावर जायचे व तटावरुनच निशाण बुरुजाकडे जायचे. येथून पुढे उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपण जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोहोचतो. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. विहिर चौकोनी आकाराची आहे. विहिरीजवळून पुर्व दिशेला गेल्यावर अंबाबाईचे कौलारु मंदिर लागते. मंदिराला लागून बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत.

अंबाबाई मंदिराच्या उजवीकडून पुढे गेल्यावर कमान बाव लागते. या विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या असून, पायर्‍यावर सुंदर कमानी आहेत. पायर्‍या संपल्यावर भुयार लागते, त्यापुढे पाणी लागते. या ठिकाणी सात कमानी आहेत. यापुढे आपणास जाता येत नाही. या ठिकाणी पुर्वी कैदयांना ठेवले जात होते. अशा आणखी ३ विहिरी सामानगडावर आहेत. या वैशिष्यपूर्ण विहिरी हे सामानगडाचे भूषण आहे.

कमान बाव पाहून आपण मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडीकडील तटावर जायचे. या तटावरुन जाताना तटाच्या बाहेर आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब आपणांस दिसतात. त्याचे प्रयोजन अदयाप कळलेले नाही. पुढे आपणांस चोर दरवाजा लागतो. येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंडया बुरुज लागतो. सोंडया बुरुजासमोर मुगल टेकटी दिसते. ती मुगल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली आहे अशी अख्यायिका स्थानिक लोकात आहे.

गड पाहून झाल्यानंतर गडावरुन सरळ जाणार्‍या सडकेने १५ मिनिटात आपण मारुती मंदिर गाठायचे. या मंदिरासमोर कातळात कोरुन काढलेली लेणी आहेत. या लेण्याच्या पायर्‍या उतरुन आत गेल्यावर महादेव मंदिर दिसते. मंदिरात मोठे शिवलिंग व अनेक कमानीदार देवळया आहेत. येथून उतरणार्‍या डांबरी सडकेने पुढे गेल्यावर आपणांस भीमशाप्पांची समाधी लागते, येथे स्वच्छ पाण्याचे कुंड आहे.

पोहोचण्याच्या वाटा : स्वत:चे वाहन असल्यास गडहिंग्लज मार्गे भडगाव  गाठायचे.  भडगाव मार्गे चिंचवाडी आणि मग सामानगडला पोहोचता येते.

राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी

पाण्याची सोय : गडावरील विहिरीत अथवा तलावात पिण्यायोग्य पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ : गड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे १.५ ते २ तास.

Kolhapur samangad youth fort protection and cleaning


References

Samangad Wikipedia